गडचिरोली मुनिश्वर बोरकर संपादक
गडचिरोली – आदिवासी विविध सहकारी संस्था मर्यादित मौंशीखांब परिसरातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचे धान विकले परंतु अजुनही धानाचे चुकारे झाले नसल्यामुळे सदर परिसरातील शेतकरी हवालदिन झालेले आहेत. का स्तकारांच्या धानाचे चुकारे न मिळल्यामुळे पिक कर्ज कसे भरावे आता खरीप हंगामही सुरु होत आहे. हंगाम कसा करावा या विवंचनेत कास्तकार सापडला आहे.
महामंडळाने शेतकऱ्यांचे खरेदी केलेले धान अजुनही उचल केलेले नाही. परंतु ६० कास्तकारांच्या धानाचे चुकारे अजुनही प्राप्त झालेले नाही तेव्हा शासनाने कास्तकारांचे चुकारे त्वरीत बॅक खात्यात जमा करावे अशी मागणी कास्तकारांनी केलेली आहे.





